अखेर बारी समाजाच्या प्रलंबित मागण्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केल्या पूर्ण

अखेर बारी समाजाच्या प्रलंबित मागण्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केल्या पूर्ण

अखिल भारतीय बारी महासंघाच्या प्रयत्न्नांना आले यश

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी

https://m.indiamart.com/impcat/npk-fertilizer.html?utm_source=anjangaonexpressnews4040&utm_medium=affiliate&utm_campaign=0624&utm_content=27

गेली आठ महिन्यापूर्वी 1 ऑक्टोबर 2023 रोजी अखिल भारतीय बारी समाज महासंघा तर्फे संत नगरी शेगाव येथे अखिल भारतीय राष्ट्रीय बारी समाज महाअधिवेशन भरविण्यात आले होते या अधिवेशनास राज्यातील केंद्रीय मंत्री, माजी मंत्री, विरोधी पक्षनेते व सर्वच पक्षाचे नेते व मान्यवर उपस्थित होते व स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ क्लिप द्वारे समाजाला संबोधन केलें होतें या कार्यक्रमाला 1 लाखाच्या घरात समाजबांधव एकत्र झाले होते. यावेळी शासन दरबारी अधिवेशनामध्ये बारी समाजाच्या वतीने मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासित केले होते यामध्ये १)
ह.भ.प. संत शिरोमणी श्री रूपलाल महाराज यांचे अंजनगाव येथे भव्य राष्ट्रीय स्मारक.
२) बारी समाजाला आर्थिक विकास महामंडळ. ३) पान पिंपरी, पानमळे, मुसळी यांना औषधी पिकाचा दर्जा ई मागण्या नुकत्याच अर्थमंत्री अजित पवार ह्यांनी विधिमडळाचे अधिवेशनात मान्य केल्या व जाहीर केले या प्रसंगी अखिल भारतीय बारी महा संघाचे अध्यक्ष रमेश घोलप अनिल हिस्सल, रमेश डब्बे, देवीदास येऊल, रुपेश येऊल, दिनेश भोंडे, उमेश भोंडे,मनोहर मुरकुटे,वृषभ सातपुते, निलेश ढगे सहीत सर्व समाज बांधवानी मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले सदरचे बाबींवर त्वरीत आदेश काढून समस्त बारी समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या मुळे व संबंधीत विभागाला पुढील कार्यवाहीसाठी आदेशीत केले, त्यामुळे सर्व बारी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गेली एक वर्षांपासूनचे अखिल भारतीय बारी समाज विकास महासंघचे प्रयत्न्नांना यश आले.

Spread the love
[democracy id="1"]